राज्याच्या राजकारणात नेहमीच केंद्रस्थानी असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या आगामी पोटनिवडणुकीत एक मोठा ट्विस्ट आला आहे. काँग्रेस पक्षाने या निवडणुकीतून माघार घेण्याची तयारी दर्शवली असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. महाविकास आघाडीतील जागावाटपाच्या सुत्रानुसार आणि स्थानिक राजकीय समीकरणांचा विचार करून काँग्रेस हा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी, या संभाव्य निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपसमोरील आव्हाने बदलणार असून, राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.













